रानडुकरांनी केला हरभरा पिकाला फटका, शेतकऱ्यांची लाखोंची नुकसान

रानडुकरांनी केला हरभरा पिकाला फटका, शेतकऱ्यांची लाखोंची नुकसान

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर तालुक्यातील पांगरी येथे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली असली तरी, रानडुक्कर आणि हरिण या जंगली प्राण्यांनी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

गावातील गट नंबर 77 मध्ये साहेबराव थोरात यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती. मात्र, रानडुक्कर यांनी या पिकाला मोठा फटका बसवून शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान केले आहे. साहेबराव थोरात यांनी सांगितले की, "मागील आठ दिवसांपासून रात्री रानडुक्कर शेतात येऊन हरभरा पिकाला नष्ट करत आहेत. उर्वरित राहिलेले पीक वाचवण्यासाठी आम्हाला जीव धोक्यात घालून राखण करावी लागत आहे. शासनाने जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे."
धारूर तालुक्यातील इतर शेतकरीही याच समस्यांना सामोरे जात आहेत. रानडुक्कर आणि हरिण यांच्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत आहे.
शेतकरी विजेच्या लपंडाव असतानाही पिकांना पाणी देऊन जोपासत होते. अशा वेळी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांचे मन खूप दुखावले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची मागणी:
 जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
 पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यावी.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!